> MPSC/UPSC: मे 2016

सोमवार, ३० मे, २०१६

मुलभूत अधिकार

प्रस्तावना
                       

                        भारतीय राज्यघटनेने नागरिकांना मुलभूत अधिकार दिलेले आहेत. या मुलभूत अधिकारांचा

समावेश भारताच्या संविधानातील भाग ३ मधील  कलम १२ ते ३५  मध्ये करण्यात आलेला आहे. मुलभूत हक्क

हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक आहेत.  व्यक्तीच्या मुलभूत हक्कांवर कोणीही अतिक्रमण

करू शकत नाही.आणि जर कोणी अतिक्रमण केले तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते.




अ.क्र. मुलभूत हक्काचा प्रकार कलम
१. समतेचा अधिकार कलम १४ ते १८
२. व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार कलम १९ ते २२
३. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम २३ ते २४
४. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम २५ ते २८
५. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार कलम २९ ते ३०
६. संपत्तीचा अधिकार कलम ३१(हा अधिकार ४४ व्या घटनादुरुस्तीने रद्द केला )
७. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम ३२ ते ३५



समतेचा अधिकार :



            राज्यघटनेत कलम १४ ते १८ मध्ये नागरिकांच्या समतेच्या अधिकाराच्या तरतुदी आहेत 

अ.क्र. कलम स्पष्टीकरण
१. कलम १४ कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान
२. कलम १५ सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोणताही भेद केला जाणार नाही 
३. कलम १६ राज्यात पात्रतेनुसार नोकरीचा अधिकार 
४. कलम १७ अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा 
५. कलम १८ व्यक्तींत भेद निर्माण होईल अशा पदव्या देणे कायद्याने बंद केले 



स्वातंत्र्याचा अधिकार :
         
         राज्यघटनेत कलम १९ ते २२ मध्ये स्वातंत्र्याच्या  अधिकाराच्या तरतुदी आहेत

           

 
अ.क्र. कलम स्पष्टीकरण
१. कलम १९ भाषण व विचारस्वातंत्र्य 


सभा भरविण्याचे स्वातंत्र्य (विना शस्त्र) 


संस्था व संघ स्थापन करण्याचा अधिकार 


भारतात सर्वत्र संचार करण्याचा अधिकार


संपत्ती धारण करण्याचा  अधिकार  


कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार   


भारतात कोणत्याही भागात स्थायिक होण्याचा अधिकार  
२. कलम २० जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत शिक्षा देता येत नाही   
३. कलम २१ व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य किंव वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही   


(कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीने ते हिरावून घेता येईल )
४. कलम २१(अ) ६ ते १४ वयोगटातील मुला मुलींना शिक्षणाचा हक्क   
५. कलम २२ अटक झालेल्या व्यक्तीला अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार   


अटक झालेल्या व्यक्तीला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार  


अटक झालेल्या व्यक्तीला २४ तासाच्या आत न्यायालयासमोर उभे करावे लागेल   
६. कलम २२(३) विशिष्ट स्थानबद्धता कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीला ३ महिन्यापेक्षा अधिक काळ स्थानबद्ध करता येणार नाही   



शोषणा विरुद्धचा अधिकार 

                         राज्यघटनेत कलम २३ ते २४ मध्ये शोषणाविरुद्द्च्या  अधिकाराच्या तरतुदी आहेत


अ.क्र. कलम स्पष्टीकरण 
१. २३ मानवाच्या क्रय - विक्रयास बंदी 
२. २४ १४ वर्षाखालील मुलामुलींना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी 



धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 



                         राज्यघटनेत कलम २५ ते २८ मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या  अधिकाराच्या तरतुदी आहेत


अ.क्र. कलम स्पष्टीकरण 
१. २५ प्रत्येक व्यक्तीस आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा किंवा धर्मांतर करण्याचा अधिकार आहे  
२. २६ धार्मिक संस्थांना संपत्ती स्वीकारण्याचा किंवा त्याची व्यवस्था पाहण्याचा अधिकार आहे 
३. २७धर्म प्रसारासाठी सक्तीने पैसा गोळा करण्यास बंदी 
4. २८ शिक्षणसंस्थांतून धार्मिक शिक्षण देण्यास बंदी 



सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार 

             राज्यघटनेत कलम २९ ते ३० मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार संबंधी  तरतुदी आहेत


अ.क्र. कलम स्पष्टीकरण 
१. २९ भाषिक व धार्मिक अल्पसंख्याकांना स्वत : च्या शिक्षणसंस्था स्थापण्याचा व चालविण्याचा अधिकार 
२. ३० वरील संस्थांना अर्थ सहाय्य देताना शासन भेद भाव करणार नाही 



संपत्तीचा अधिकार 
         

               मुळ भारतीय घटनेत कलम ३१ मध्ये संपत्तीच्या अधिकाराचा समावेश मुलभूत अधिकारात करण्यात आला होता  पण ४४ व्या घटनादुरुस्तीने १९७८ साली सरकारने हा अधिकार मुलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकला


               सद्यस्थितीत संपत्तीचा अधिकार कलम ३०० क मध्ये असून तो कायदेशीर अधिकार आहे


घटनात्मक उपायांचा अधिकार 

              नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कलम ३२ मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार देण्यात आला आहे

              कलम ३२ नुसार सर्वोच्च न्यायालये मुलभूत अधिकारांचे रक्षण करील तर कलम २२६ नुसार  उच्च न्यायालयाला हे अधिकार देतात
           

मुलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकाला पाच  प्रकारचे अर्ज करता येतात


अ.क्र. अर्ज  स्पष्टीकरण
१. बंदी प्रत्याक्षीकरण लेख बेकायदेशीर अटक केलेली व्यक्ती न्यायालयात आपल्या अटके विरुद्ध दाद मागू शकते 
२. परमादेश  लेख याद्वारे व्यक्ती , संस्था , शासन /शासकीय अधिकारी किंवा कनिष्ट स्तर न्यायालये यांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाद्वारे दिलेल्या आदेशानुसार कृती करावी लागते  
३. प्रतिषेध लेख या लेखाद्वारे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालय  सरकार द्वारा गठीत न्यायाप्रधीकारणे किंवा कनिष्ठ न्यायालये यांना न्यायप्रविष्ठ प्रकरणातील एखादी कार्यवाही न करण्याबाबत आदेश देतात   
४. अधिकार पृच्छा लेख  अधिकार नसताना अधिकार गाजविणाऱ्या व्यक्ती बाबत उच्च किंवा सर्वोच्च न्यायालये हा लेख काढतात 
५. उत्प्रेषण लेख  उच्च नायायालये कनिष्ट न्यायालयांकडून विशिष्ट प्रकरणातील पुरावे  व कागदपत्रे मागून घेवू शकतात 








फक्त भारतीय नागरिकांसाठी असलेले अधिकार  भारतीय नागरिक आणि विदेशी नागरिक या दोन्हींसाठी असलेले अधिकार 

कलम १५,१६,१९,२९,३०कलम १४,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८

                अशा प्रकारे भारतीय राज्य घटनेत विस्तृतरित्या मुलभूत अधिकारांचे वर्णन करण्यात आले आहे 


गुरुवार, १२ मे, २०१६

बुद्धिमत्ता चाचणी ३







१.आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ७ : ३ आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ६: २ होते तर मुलाचे आजचे वय किती ?

अ .१४ वर्षे

ब .१८ वर्षे

क .१५ वर्षे

ड .२० वर्षे

उत्तर
क.१५ वर्षे 
_________________________________________________________________________________
२.अ हा ब पेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे . त्यांच्या वयाची बेरीज ३३ आहे तर ब चे वय किती 
अ .११ वर्षे

ब .१२ वर्षे

क .१३ वर्षे

ड .१४ वर्षे
उत्तर
क १३ वर्षे 
_________________________________________________________________________________
३.सारंग व सुनील यांच्या आजच्या वयात ९ वर्षाचा फरक आहे सारंग सुनील पेक्षा लहान आहे आणखी ९ वर्षांनी त्यांच्या वयात किती फरक पडेल ?

अ .९

ब .१८

क .१०

ड.यापैकी नाही
उत्तर
अ.९
_________________________________________________________________________________
४.अ , ब ,क यांच्या वयाची बेरीज ८९ वर्षे आहे.  ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?

अ .८५

ब .७७

क .८३

ड .७२
उत्तर
ब .७७
_________________________________________________________________________________
५. अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे दोघांच्या वयाची बेरीज १८ वर्ष आहे तर ब चे दोन वर्षापूर्वी किती वय होते ?

अ .४

ब .६

क .८

ड .१०
उत्तर
अ.४
_________________________________________________________________________________
६. अ हा क पेक्षा २ वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज २८ असल्यास अ चे वय किती 
अ .१५

ब .१८

क .१२

ड .१३
उत्तर
 ड.१३
_________________________________________________________________________________
७. मोहनचे वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे. १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ३ होईल तर मोहनचे आजचे वय किती ?

अ .४

ब .५

क .१०

ड .६
उत्तर
क. १०
_________________________________________________________________________________
८.दहा वर्षापूर्वी संजय व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर १:७ होते,  परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:२ होईल, तर राहुलचे आजचे वय किती ?
अ .१४

ब .१८

क .१६

ड .१२
उत्तर
अ.१४
_________________________________________________________________________________
९.सीमाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या १/३आहे.  सीमाच्या आईचे वय तिच्या वडिलांपेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. सीमाचे आजचे वय १३ वर्षे असल्यास तिच्या आईचे सीमाच्या जन्माच्यावेळीचे वय किती होते ?

अ .१८

ब .१९

क .२०

ड .२१
उत्तर
ड. २१
_________________________________________________________________________________
१० .तीन मुलांच्या आजच्या वयाची बेरीज ८० वर्ष आहे २ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?
अ .७४

ब .७२

क .७८

ड .७०
उत्तर
अ .४७

_________________________________________________________________________________


गुरुवार, ५ मे, २०१६

बुद्धिमत्ता चाचणी : वय

प्रस्तावना



                              'वय' या घटकावर स्पर्धा परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. या घटकाचा अभ्यास करताना गुणोत्तर व प्रमाण या गणितातील घटकातील मुलभूत संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे.



उदाहरण १




मुलगा व वडील  यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३ : ८ आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ७ होते तर वडिलांचे आजचे वय किती ?

अ. ३५

ब.४०

क.४५

ड.५०


उत्तर व स्पष्टीकरण 



अशा प्रकारच्या गणितात सर्व प्रथम आजच्या वयाचे  गुणोत्तर दिले आहे, त्या गुणोत्तराचा स्थिरांक x मानवा
 मुलगा व वडील यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर ३:८ आहे येथे गुणोत्तराचा स्थिरांक x मानु

म्हणून           मुलाचे  आजचे वय =३ x    आणि 
                    वडिलांचे आजचे वय = ८ x
म्हणून          पाच वर्षापूर्वी मुलाचे वय = (३ x) -५  आणि
                   पाच वर्षापूर्वी वडिलांचे  वय= (८ x)-५

आता उदाहरणातील अटीनुसार , पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ७ होते

म्हणजेच
(३ x) -५  भागिले (८ x)-५ = २ भागिले ७

आता तिरकस गुणाकार करून
(३ x) -५ गुणिले ७ =(८ x)-५गुणिले २

२१x-३५     = १६x-१०
(२१x)-(१६ x)=२५
५x=२५
x=५
म्हणून मुलाचे आजचे वय =३x =३*५ =१५ वर्षे
आणि वडिलांचे आजचे वय = ८x=८*५=४० वर्षे

अचूक उत्तर पर्याय ब ४० वर्षे




उदाहरण  २



सचिन पेक्षा सौरभ २० वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास सचिनचे वय किती ?

अ. ५

ब. २५

क.३०

ड.३२


उत्तर व स्पष्टीकरण 




समजा सचिनचे वय x वर्षे आहे

म्हणून सौरभचे वय (x - २०) वर्षे आहे

आता उदाहरणातील अटीनुसार ,

x +(x -२०) =३०

म्हणून , २x-२० = ३०

म्हणून , २x =५०

म्हणून , x  = २५

म्हणून सचिनचे वय x = २५ वर्षे

अचूक उत्तर ब . २५


उदाहरण  ३



सारंगचे वय अभिजीतच्या वयाच्या दुपटीपेक्षा २ ने जास्त आहे राजचे वय सारंगच्या वयापेक्षा ५ ने जास्त आहे राजचे वय ५ वर्षानंतर ३० वर्षे होईल.  तर अभिजीतचे आजचे वय किती ?

अ.९

ब.१०

क.२५

ड.२२


उत्तर व स्पष्टीकरण 




समजा अभिजीतचे आजचे वय x वर्षे आहे 

म्हणून सारंगचे वय (२x +२) वर्षे 

राजचे ५ वर्षानंत वय ३० वर्षे होईल

म्हणून राजचे आजचे वय २५ वर्षे 

उदाहरणातील अटीनुसार 

राजचे वय = सारंगचे वय +५

म्हणून २५=(२ x +२) +५

म्हणून २५= २ x+७

म्हणून १८= २x

म्हणून x = ९

अचूक उत्तर अ . ९


सोमवार, २ मे, २०१६

ब्रिटीश राजवटीतील कायदे



  • कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटीश संसदेने केलेला पहिला कायदा

  • या कायद्याद्वारे सर्व प्रांतावर म्हणजेच मुंबई , मद्रास व बंगाल या तीन प्रांतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आले.  पूर्वी प्रत्येक प्रांतावर स्वतंत्र गव्हर्नर होते 
  • या कायद्याने मध्यवर्ती केंद्र सरकार /सर्वोच्च सरकारची स्थापना करण्यात आली 
  • सल्लागार मंडळ -या कायद्याने गव्हर्नर जनरला प्रशासकीय कार्यात मदत व मार्गदर्शन करण्याकरिता एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले {सदस्य संख्या चार }
  • भारतासाठी कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली 
  • या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार करण्यास तसेच भारतीय लोकांकडून भेटी स्वीकारण्यास बंदी करण्यात आली 

  • गव्हर्नर जनरलच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटीश संसदेने केलेला कायदा 
  • सहा जणांचे बोर्ड ऑफ कंट्रोल निर्माण करण्यात आले याचे मुख्य कार्य गव्हर्नर जनरल व इस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण ठेवणे
  • १७७३ च्या कायद्यात असणाऱ्या सल्लागार मंडळाची संख्या चार वरून तीन करण्यात आली 
  • १७७३ च्या कायद्यात केलेल्या तरतुदीमुळे १७९३,१९१३,१८३३,१८५३ साली चार्टर अॅक्ट  संमत करण्यात आले 

  • १८१३ च्या चार्टर अॅक्टनुसार -- इस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्ठात आली इतर ब्रिटीश कंपन्यांना आणि व्यक्तींना व्यापार करण्याची परवानगी मिळाली 
  • १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार--- दासप्रथा नष्ट करण्यात आली, लोकसेवेसाठी पात्रता निश्चित करण्यात आली , धर्म, जात , वंश , जन्म यावरून भेदभाव न करण्याचे ठरले 
  • १८५३ च्या चार्टर अॅक्टनुसार----कायदेविषयक व कार्यकारी कार्ये वेगळी करण्यात आली , खुल्या स्पर्धेद्वारे अधिकारी भरतीची पद्धत स्वीकारण्यात आली . 

  • या कायद्याने प्रांतामध्ये उच्च न्यायालये स्थापन करण्यात आले 
  • मद्रास व मुंबई प्रांतात स्वतंत्र कायदेमंडळे स्थापन करण्यात आली 
  • या कायद्याने व्हाईसरॉयला आणीबाणीच्या स्थितीत अध्यादेश काढण्याचा अधिकार मिळाला                                 
      
  • या कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता देण्यात आली
  • वृत्तपत्रांवर लादलेले बंधन काढून घेण्यात आले  

  • या कायद्याने केंद्रीय कार्यकारी मंडळाची सदस्यसंख्या वाढविण्यात आली
  • प्रांताला कायदेविषयक अधिकार देण्यात आले 
  • प्रांतीय कायदे मंडळातील निम्मे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडावेत असे ठरले 
  • या कायद्याने भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश मिळाला 
  • कायदेकरी सत्ता व कार्यकारी सत्ता  वेगळ्या करण्यात आल्या 

रविवार, १ मे, २०१६

अर्थशास्त्र प्रश्नसंच ३






१.दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?

अ .महाराष्ट्र

ब .ओडिशा

क .बिहार

ड .उत्तर प्रदेश

उत्तर
ड उत्तर प्रदेश 

२.दारिद्र्य रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे ?

अ .जम्मू काश्मीर

ब .हिमाचल प्रदेश

क .महाराष्ट्र

ड .गोवा
उत्तर
ड. गोवा 

३.भारत सरकारने कोणत्या वर्षी आपला पहिला मानव विकास अहवाल सादर केला ?

अ .२००१

ब .२०११

क .१९९१

ड. २००४
उत्तर
अ. २००१

४.भारत मानवविकास अहवाल, २०११ प्रमाणे देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

अ गोवा

ब .पंजाब

क .महाराष्ट्र

ड .केरळ
उत्तर
ड .केरळ 

५.महाराष्ट्र  राज्याने आपला पहिला मानव विकास अहवाल केव्हा प्रसिद्ध केला 
अ .२००१

ब .२००२

क .२००३

ड .२००४
उत्तर
ब.२००२

६.जगाच्या लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे ?

अ .पहिला

ब .दुसरा

क .तिसरा

ड .पाचवा
उत्तर
 ब. दुसरा 

७ .भारतीय चलनातून २५ पैशाचे नाणे केव्हा बंद झाले ?
अ .१ मे २०१२

ब .१ ऑगस्ट २०११

क .१ मे २०११

ड .१ ऑगस्ट २०१२
उत्तर
ब .१ ऑगस्ट २०११

८.२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे ?

अ .९५७

ब .९२७

क .९२५

ड .९३६
उत्तर
क ९२५

९. महाराष्ट्रात सहकार तत्वावर पहिला हातमाग कोठे सुरु झाला ?

अ .इचलकरंजी

ब .कोल्हापूर

क .मालेगाव

ड .भिवंडी
उत्तर
अ. इचलकरंजी

१०. भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात आहे ?

अ .मासेमारी

ब .कृषी

क .औद्योगिक

ड. वाहतूक व दळणवळण
उत्तर
ब. कृषी