> MPSC/UPSC: अर्थशास्त्र प्रश्नसंच 2

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

अर्थशास्त्र प्रश्नसंच 2







१.खालील कोणत्या धोरणांचा अवित्तीय धोरणात समावेश होतो  ?
अ .किंमतविषयक धोरण

ब . मजुरीविषयक  धोरण

क .सामाजिक सुरक्षिततेविषयी धोरण

ड .वरील सर्व

उत्तर
ड वरील सर्व 

२. भारतीय घटनेच्या ------- कलमानुसार संचित निधी उभारलेला आहे  ?
 अ २६६/१

ब . २६६/२

क २६७

ड यापैकी नाही
उत्तर
अ २६६/१, २६६/२ नुसार लोक खाते तर २६७ नुसार आकस्मिक निधी उभारला जातो 

३. निवृत्त कर्मचार्यांना पेन्शन देण्याचे काम केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या कोणत्या शाखेद्वारे केले जाते ?
 अ .आस्थापना विभाग .

ब .महालेखा पाल

क नियोजन विभाग  १

ड नियोजन विभाग २
उत्तर
ब महा लेखापाल 

४. ज्या वस्तूंची किंमत वाढली असता मागणी वाढते अशा वस्तूंना ------ वस्तू म्हणतात . 
 अ .गुण वस्तू

ब .सामुहिक वस्तू

क गीफेन वस्तू

ड सामाजिक वस्तू
उत्तर
क गिफेन वस्तू 

५ १९९४-१९९५ पासून -------- समितीच्या शिफारशीनुसार सेवांवर कर आकारला जातो ?
 अ .राजा चेलय्या .

ब .महावीर त्यागी

क राज समिती

ड विजय केळकर
उत्तर
अ राजा चेलय्या 

६.भारतात आयकर भरणाऱ्या व्यक्ती एकून लोकसंख्येच्या ------------ आहे 
 अ .२. ५ % पेक्षा कमी

ब . २. ५ ते ५ % दरम्यान

क ५ ते ७. ५ % दरम्यान

ड १० ते १२% दरम्यान
उत्तर
अ २. ५ % पेक्षा कमी 

७ विक्रीकर संकलनात कोणते राज्य आघाडीवर आहे  ?
 अ ..केरळ

ब .गुजरात

क तामिळनाडू

ड महाराष्ट्र
उत्तर
ड महाराष्ट्र 

८ सेवांवर कर आकारणी कोण करू शकते ?
 अ .फक्त केंद्र सरकार

ब .फक्त राज्य सरकार

क केंद्र  आणि राज्य सरकार

ड स्थानिक स्वराज्य संस्था
उत्तर
अ फक्त केंद्र सरकार 

९. सार्वजनिक आय व्ययात कोणती बाब महत्त्वाची असते  ?
 अ सार्वजनिक उत्पन्न

ब . सार्वजनिक खर्च

क व्यवहार तोल

ड व्यापार तोल
उत्तर
ब सार्वजनिक खर्च 

१०. निष्पादन अर्थसंकल्प सर्व प्रथम --------------- राज्याने मांडला . 
 अ .महाराष्ट्र

ब .कर्नाटक

क गोवा

ड राजस्थान
उत्तर
अ महाराष्ट्र 





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा